आरोग्य

उन्हाळ्यात आंब्याचा रस पिण्याचे फायदे

उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे नको नको होणारा हा उन्हाळा केवळ आंब्यासाठी(mango juice) नक्की सुसह्य असू शकतो. आंब्यामध्ये (mango juice) व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप आवश्यक आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे (mango juice) चवीला जितके मधूर असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र कोणतीही गोष्ट किती खायची याला काहीतरी प्रमाण असावे अन्यथा त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.आंबा खाल्ल्याने वजन वाढते असा समज असतो. मात्र तो चुकीचा असून वजन कमी करण्यासाठी आंबा (mango juice) फायदेशीर ठरतो.उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याचा रस (mango juice) प्यायला तर तो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.(Benefits of drinking mango juice in summer)

आंबा (mango juice) हा सर्वांचा आवडता असतो. तसे आंब्याचे अनेक प्रकार आहेत. आंबा चवीला अतिशय चवदार असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तो आवडतो. त्याचबरोबर आंब्याच्या चवीबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण त्याच्या फायद्यांबद्दल माहिती नसेल. होय, आंबा स्वादिष्ट तसेच अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याचा रस (mango juice) प्यायला तर तो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. पाहूयात आंबे (mango juice) खाण्याचे शरीराला असणारे फायदे

उन्हाळ्यात आंब्याचा रस (mango juice) पिण्याचे फायदे-

कोलेस्टेरॉल कमी
आंब्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती मजबूत राहते. कारण हे शरीरातील लो डेन्सिटी लिपोप्रोटिन्स कमी करण्यास उपयुक्त आहे, तर रोज आंब्याचा रस प्यायल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित राहते, ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. यासोबतच तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात दररोज आंब्याचा रस पिऊ शकता.

बीपी नियंत्रित होतो
आंब्याच्या रसात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे उन्हाळ्यात रोज आंब्याच्या रसाचे सेवन केल्यास तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच स्ट्रोक आणि हार्ट अटॅकची समस्या उद्भवत नाही.

डोळ्यांसाठी फायदेशीर
आंब्याचा रस व्हिटॅमिन सी तसेच व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे, जो आपल्या दृष्टीसाठी थेट चांगला आहे. अशावेळी जर तुम्ही रोज आंब्याच्या रसाचे सेवन केले तर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या होत नाहीत आणि दृष्टीही तीक्ष्ण होते.

प्रथिनांचे सहज विघटन होण्यास मदत
आंब्या मध्ये असलेल्या आहारातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आंब्यातील एन्झाईम्स प्रथिनांचे सहज विघटन होण्यास मदत करतात. आतड्यात फायदेशीर बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देऊन, आंबा खाण्यातून ऊर्जा पातळी सुधारते.

त्वचेचे सुधारते आरोग्य
आंब्याचे आतडे आणि एकूणच आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोलिन यांसारख्या अँटी ऑक्सिडंट्सचे उच्च प्रमाण नियमित सेवनाने त्वचेची चमक वाढवू शकते. आहारात आंब्याचा समावेश करून त्वचेची नैसर्गिक चमक वाढवता येते.

शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत
आंब्यामध्ये असलेल्या पॉलिफेनॉलमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात आणि ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात, ऑक्सिडेटिव्ह तणाव ही एक हानिकारक प्रक्रिया आहे. जी शरीरात अँटि ऑक्सिडंट्स आणि मुक्त रॅडिकल्समध्ये असंतुलन असताना उद्भवते. जेव्हा मुक्त रॅडिकल्सची संख्या अँटीऑक्सिडंट्सपेक्षा जास्त असते, तेव्हा ते निरोगी पेशींवर हल्ला करू शकतात, ज्याचा विविध प्रकारच्या कर्करोगाशी संबंध आहे.

डायरियाच्या समस्येवर परिणामकारक
उन्हाळ्यात आमरसाचे सेवन केल्यास डायरियाची समस्या टळते. शिवाय मळमळ, उलट्या, जुलाब अशा समस्यांवर देखील मात करण्यासाठी आमरसाचे सेवन करावे.

संसर्ग टाळण्यासाठी फायदेशीर ठरते
उन्हाळ्यात कोणत्याही ऍलर्जी किंवा संसर्गापासून बचाव हवा असेल तर आंबे खाणे फायदेशीर मानले जाते. कारण आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे संक्रमणाशी लढायला मदत करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.

पचनक्रिया मजबूत होते
आमरसाच्या सेवनामुळे पचनक्रिया मजबूत होते. शिवाय पोटाशी संबंधित इतर समस्या देखील कमी होतात. कारण आंब्यामध्ये असणारे फायबर आपल्याला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. परिणामी पचनक्रिया सुलभ आणि सुरळीत होते.

अधिक काळ ऊर्जा टिकते
आमरसाचे सेवन करण्यासाठी कोणती वेळ निश्चित करण्याची गरज नाही. कधीही, केव्हाही आणि कुठेही आमरस पिता येतो. मात्र, आरोग्यदायी फायद्यांसाठी आमरस सकाळी पिणे अधिक फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरात अधिक काळ ऊर्जा टिकून राहते.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

7 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

7 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

8 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago