टीम लय भारी
मुंबई l महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात शनिवार (14 नोव्हेंबर) दिवसभरात ४ हजार २३७ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, २ हजार ७०७ जण कोरोनामुक्त झाले. तर १०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४१ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १६ लाख १२ हजार ३१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ८५ हजार ५०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ४५ हजार ९१४ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.
दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली तरी करोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या प्रमाणानुसार जिल्ह्य़ातील रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्य़ांना दिल्या आहेत.
तसेच कोरोना आणि बिगरकरोना उपचारांचा मेळ साधण्यासाठी आधुनिक सुविधांसह उपचार विशेष (सुपर स्पेशालिटी) रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेशही सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत. यामुळे अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना साथीच्या काळात सरसकट सर्वच आरोग्य व्यवस्था कोरोना केंद्री झाल्याने इतर आजारांच्या सेवा काही प्रमाणात खंडित झाल्या होत्या. आधुनिक उपचार देणारी सुपरस्पेशालिटी रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून कार्यरत असल्याने तातडीच्या नसलेल्या अनेक शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत.
संसर्गाची तीव्रता गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याने आता इतर आजारांच्या सुविधाही उपलब्ध करण्याच्या उद्देशातून रुग्णोपचार व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…