मुंबई l महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजार ४३९ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५८ हजार ८७९ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.६९ टक्के इतका झाला आहे.
महाराष्ट्रातील मृत्यू दर हा २.६१ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३ लाख ६६ हजार ५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८९ हजार ८०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
सध्या राज्यात ५ लाख ३६ हजार ६४९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार २११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८३ हजार २२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ५ हजार ४३९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधितांची एकूण संख्या ही १७ लाख ८९ हजार ८०० इतकी झाली आहे.
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…