महाराष्ट्र

अन्वय नाईक कुटुंबिय देवेंद्र फडणवीसांवर संतापले

टीम लय भारी

मुंबई :-  मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे राजकीय वाद सुरू आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन गदारोळ घालण्यात आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून अन्वय नाईक प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आले असून फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईकने यांनी फक्त श्रीमंतानाच न्याय मिळणार का? अशी विचारणा  “सुप्रीम कोर्टाचा निकाल नाही तर फक्त जामीन दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत असून आमचा लढा अद्याप सुरु आहे,” असे सांगत यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला, तसेच मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळे फासले असे म्हणणे योग्य वाटतं का? अशी देखील विचारणा केली.

आम्हाला ज्या धमक्या येत आहेत त्याचं काहीच नाही का? आम्हाला अद्यापही धमक्या दिल्या जात आहेत असे अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितले. “अर्णब गोस्वामी जेलमधून बाहेर पडल्यावर सर्वांसमोर धमकी देत होता, आम्हाला दोन दिवस झोप लागली नाही,” असे त्या म्हणाल्या. आमची केस दाबली गेली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

“आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हे देखील बाहेर काढावे. मी आणि आई मनाचे काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावे.. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या,” असे आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिले. तसेच किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? असा सवाल विचारला. अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. तसेच गरज लागल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.

फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबले – अनिल देशमुख

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आले, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर देत, माझी खुशाल चौकशी करा, माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असे म्हटले.

फडणवीसांनी गृहमंत्र्यांवर दाखल केला हक्कभंग!

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अवमान केला आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दिसून येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात केली आहे”.

Rasika Jadhav

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

6 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

9 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

10 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago