टीम लय भारी
मुंबई l रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय उद्या (सोमवार) निर्णय देणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता उद्या होणार आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. आता त्यांच्या जामिनावर उद्या निर्णय होणार आहे. जर उद्याही त्यांना जामीन मिळाला नाही तर अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं आहेत.
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीसाठी अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावरील सुनावणी सोमवार, ९ नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतल्याने सुनावणी स्थगित करण्यात आली.
अंतर्गत सजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा यांना अलिबाग पोलिसांनी ४ नोव्हेंबरला अटक केली होती. अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज केला होता.
अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…
शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…
भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…
वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…
बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…