टीम लय भारी
मुंबई : राज्यात कोरोना महासाथीची दुसरी लाट आली आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार आदेश जारी करण्यात आले असून आजपासूनच हा आदेश लागू असणार आहे.
राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन शुक्रवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत स्थितीचा आढावा घेऊन रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज लॉकडाऊन वाढवण्यासोबतच जमावबंदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. हा आदेश १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. परंतु लॉकडाऊनमुळे सारे जीवनमान बदलते हा पूर्वानुभव लक्षात घेता सरसकट लॉकडाऊन लागू केले जाणार नाही. त्याऐवजी रविवारी रात्रीपासून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिक बाहेर एकत्र फिरू किंवा जमू शकणार नाहीत.
नाईट कर्फ्यूमध्ये पब आणि हॉटेल्स बंद राहणार
आम्ही पाहत आहोत, ज्या सोसायटींमध्ये पाच पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळतील, त्या सोसायटी सील केल्या जाणार आहे. झोपडपट्टी व चाळींमध्ये मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. तर, नाईट कर्फ्यूमध्ये पब आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील– महापौर किशोरी पेडणेकर
असे आहेत नियम
असे असतील दंड
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…