टीम लय भारी
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना मनी लाँन्ड्रिग प्रकरणी सध्या अटकेत आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडी सरकारने त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. या सर्व प्रकरणावरून भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी महाविकास आघाडी सरकारला सल्ला दिला की, महावसुली ठाकरे सरकार मा. नवाब मलीक मंत्री यांचा राजीनामा घेणार नसेल, तर यांच्या मंत्रालयातील ऑफीस समोरील नेमप्लेट वर जेलचा नंबर टाका आणि जेलमध्ये मंत्री म्हणून नेमप्लेट लावण्यासाठी ठाकरे सरकारनी जेलरकडे शिफारस करावी जेणेकरून ठाकरे सरकारचा स्वाभिमान वाढेल.
ठाकरे सरकारनी संविधानिक मान सन्मानाचा अपमान केला आहे. राज्यातील जनता कदापिही माफ करणार नाही….. !!!
ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून दूर करावं, अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने अजूनही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही.
आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…
ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…
काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…
हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…
धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…
लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…