टीम लय भारी
मुंबई :- मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेते आक्रमकपणे करत आहेत. भाजप सत्तेसाठी परमवीर सिंगांचा वापर करत आहे असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे म्हणणे आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांना वाटते की, परमबीर सिंग यांनी हे पत्र कोणाच्या तरी सांगण्यावरून लिहिले आहे. या पत्रासाठी परमबीर सिंग यांच्यावर दबाव टाकला असेल असे थोरात यांना वाटते. तसेच बाळासाहेब थोरात यांना वाटते आहे की, विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
‘देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचे काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी, असे थोरात यांनी म्हटले आहे.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, यासह अनेक गंभीर आरोप सिंग यांनी पत्रात केले आहेत. हे पत्र पाठवण्यामागे परमबीर सिंग यांच्यावर कुठलातरी दबाव आहे. त्यातूनच त्यांनी हे पत्र दिले असावे असे वाटते. पत्र दिले गेले म्हणून राजीनामा घेणे, हे योग्य नसल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. तर सत्ता नसल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतूनच सातत्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी होत असल्याचे थोरात म्हणाले.
देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही
सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे ही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…