दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे आगमन होण्यास विलंब होत आहे. 15 जून होऊन गेला तरी पाऊस दडी मारून बसला आहे. तसेच पावसाचे आगमन होण्यास अजून एक आठवडा लागण्याची शक्यता आहे. मात्र जूनच्या अखेरपर्यंत पावसाने हजेरी लावली तरी, पाऊस किती पडणार यावर शंका निर्माण झाली आहे. यामुळे पलिका प्रशासनाला निर्णय घेणे महत्वाचे आहे. पालिका प्रशासनाला नाईलाजाने पाणी कपात करावी लागेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिली आहे.
यंदा 15 जून होऊन सुध्दा तरी ही पावसाची लक्षणे दिसत नाहीत. त्यातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रात येऊ घातलेला पाऊस लांबला. त्यामुळे मान्सूनचे आगमनही लांबले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी दिली आहे. मुंबईला रोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा सात तलावांमधून होत असतो.
हे सुध्दा वाचा:
गुजरातला तडाखा दिल्यानंतर, बिपरजॉय चक्रीवादळाचे राजस्थानकडे कूच
एकनाथ शिंदे यांनी पुणेकरांची नाराजी दूर केली; आकाशवाणीचा वृत्तविभाग सुरुच राहणार
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुढाकार, वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा
मुंबईत 33 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईला पाण्याची गरज असल्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा या दोन तलावांची मदत घेतली आहे. बृहन्मुंबई शहराला सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये विहार, तुळशी, तानसा, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या धरणांचा समावेश होतो.या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता 14.5लाख मिलियन लिटर इतकी आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे मनपाने सांगण्यात आले आहे.
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…