महाराष्ट्र

पुण्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; शेखर गायकवाड यांना ‘धक्का,’ तर चौघांना बढती

टीम लय भारी

मुंबई : पुण्यात ‘कोरोना’चा संसर्ग वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुण्यातील IAS अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केली आहे. याचा फटका महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना बसला आहे. त्यांची बदली करण्यात आली असून अन्य चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत ( Five IAS officers transferred in Pune ).

शेखर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून विक्रम कुमार यांची नियुक्ती केली आहे. विक्रम कुमार हे पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. विद्यमान साखर आयुक्त सौरभ राव यांची विभागीय आयुक्तांकडे विशेष कार्य अधिकारी ( ओएसडी ) म्हणून नियुक्ती केली आहे.

विद्यमान कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची बदली पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. नवखे आयएएस अधिकारी असलेले जितेंद्र दुधी यांची नियुक्ती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे. ते सध्या मंचरमध्ये ( पुणे ) आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते.

बदली झालेल्या या पाच अधिकाऱ्यांपैकी शेखर गायकवाड यांच्यावर एक प्रकारे ‘कारवाई’च केल्यासारखेच दिसत आहे. अन्य पाच अधिकाऱ्यांना मात्र बढती दिल्याचे दिसत आहे.

शेखर गायकवाड ही मराठी व्यक्ती आहेत. तळागाळात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ‘कोरोना’च्या काळातही त्यांनी उत्तम काम केले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत गायकवाड यांनी ‘कोरोना’च्या स्थितीबाबत ( Coronavirus in Pune ) प्रभावी सादरीकरण केले होते. असे असताना गायकवाड यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, IAS शेखर गायकवाड यांच्या तुलनेत विक्रम कुमार हे कमकुवत व कमी अनुभव असलेले आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे गायकवाड यांना डावलून ठाकरे सरकारने नक्की काय साधले याबद्दल उलटसूलट चर्चा सुरू आहे.

तुषार खरात

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

9 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

10 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

11 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

15 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

15 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

17 hours ago