महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे ‘ही’ मागणी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी लॉकडाउन केले आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे ४५ वर्षांवरील प्रत्येकाला महाराष्ट्रात कोरोनाची लस दिली जावी असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे दिला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यावेळी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे हा प्रस्ताव ठेवाला आहे.

सध्या ज्यांना आजार आहे अशा ४५ ते ६० वर्षा दरम्यानच्या लोकांना कोरोनाची लस टोचली जाते. परंतु, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली पाहिजे, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्राला दिला आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक सादरीकरण केले. त्यात येणाऱ्या काळात ४५ वर्षांवरील सर्व लोकांना कोणत्याही सर्टिफिकेटशिवाय कोरोनाची लस टोचण्याची योजना असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. सध्या गंभीर आजार असलेल्यांना लस देण्यात येते. येणाऱ्या काळात ही अट हटविण्यात येणार आहे, असे ही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दुसरी लाट थोपवायची आहे

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जनतेशी ही संवाद साधला. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. देशातील ७०  जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत १५० टक्के वाढ झाली आहे. आपल्याला कोरोनाची ही दुसरी लाट तात्काळ थोपवायची आहे. त्यासाठी आपल्याला निर्णायक पावले उचलावी लागतील, असे मोदींनी सांगितले.

छोटा शहरातील टेस्टिंग वाढवावी लागेल

यावेळी मोदी यांनी पुन्हा एकदा छोट्या शहरात टेस्टिंग वाढवण्यावर भर दिला. लहान शहरांमध्ये रेफरल सिस्टिम आणि अॅम्ब्युलन्स नेटवर्कवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला पाहिजे. तसेच हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावणे इत्यादी गोष्टींवर भर दिला पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.

लस वाया घालवू नका

लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशात दहा टक्के कोरोना व्हॅक्सीन वाया घालविण्यात आल्या आहेत. असा प्रकार होता कामा नये, असे सांगतानाच देशात आपण दररोज ३० लाख लसीकरण करत आहोत. या लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्यासाठी व्हॅक्सीन वाया घालवण्याचे प्रकार थांबवले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

7 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

8 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

9 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

9 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

9 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

12 hours ago