टीम लय भारी
मुंबई : केंद्र व राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अन्य समाज घटक या योजनांचा लाभ घेत असते. परंतु बौद्ध समाज अल्पसंख्याक समाजाचा लाभ घेत नाही. बौद्ध समाजानेही अल्पसंख्याक योजनांचा लाभ घ्यायला हवा, अशा भावना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी व्यक्त केल्या आहेत.
‘मी बुद्धिस्ट फाऊंडेशन’च्या शिष्टमंडळाने नुकतीच कोशियारी यांची राजभवनमध्ये भेट घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. विश्वास काश्यप आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांना ‘महामानव’ हा ग्रंथ भेट दिला. या शिष्टमंडळात संस्थेचे विश्वस्त पत्रकार दीपक पवार, प्रा. संगीता वारभुवन आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी राज्यपालांनी शिष्टमंडळाशी संवाद साधला.
राज्यपाल कोशियारी म्हणाले की, आता संविधानामुळे सर्वच शोषित घटकांना त्यांचे अधिकार मिळू लागले आहेत. संविधानिक अधिकारांमुळे देशातील बौद्ध समाजाला अनेक अधिकार प्राप्त झाल्याने त्यांची प्रगती होत आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजाने अल्पसंख्याक म्हणून सर्व लाभ घेऊन आपली प्रगती साधली पाहिजे. संस्थेच्या कार्याबाबतही राज्यपालांनी विशेष कौतुक केले.
महाविद्यालय शिष्यवृत्तीसारख्या योजनांमध्ये बौद्ध समाज ‘अनुसूचीत जाती’च्या योजनांचा लाभ घेत असतो. त्यामुळे ‘अल्पसंख्याकां’साठी असलेल्या योजनांमध्ये बौद्धांचे प्रमाण फार कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर कोशियारी यांनी हे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
राज्य सरकारच्या ‘अभ्यासू’ अधिकाऱ्याला मुंबई विद्यापीठात सन्मानाचे स्थान
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…