सावधान : औरंगाबादमध्ये विनापरवाना घुसल्यास ‘जेल’मध्ये जाल!

टीम लय भारी

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रकोप वाढत चालला आहे. नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून सर्व स्तरातून खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबादमध्ये विनापरवाना गावात घुसल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ मंगशे गोंदवले यांनी दिले आहेत.

गावागावातला कोरोना रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेने हे कडक पाऊल उचलले आहे. पास किंवा परवानगी घेऊनच गावात प्रवेश दिला जाणार आहे. विनापरवाना गावात घुसल्यास पोलीस ठाण्याची हवा खावी लागणार आहे.

सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटलांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत.

पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील सर्व यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लढत आहे. सरकारी पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे तरी सुध्दा रुग्ण संख्यावाढत चालली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत.

अभिषेक सावंत

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

38 mins ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

53 mins ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

14 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

15 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

18 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

18 hours ago