टीम लय भारी
मुंबई : नोव्हेंबर महिन्याची पहाट गुलाबी थंडीने उजाडली खरी; मात्र ऐन दिवाळीत (Diwali) थंडी गायब झाली असून राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीच्या तापमानाचा पारा सरासरीपुढे गेला आहे. हवामान बदलाच्या या स्थितीमुळे आता अवकाळी हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणा-या थंड वा-यांच्या प्रवाहांमुळे राज्यात आठवडाभर सर्वच ठिकाणी किमान तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाला होता. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, सध्या उत्तरेकडील थंड वा-यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये वा-यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होऊन रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.
कोकणातील रात्रीचे तापमान सरासरीच्या आसपास आहे. मध्य महाराष्ट्रात त्यात २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भातही बहुतांश ठिकाणी ३ अंशांनी किमान तापमान वाढले आहे. मराठवाड्यातही ३ ते ४ अंशांनी तापमानात वाढ झाली असून, केवळ उस्मानाबाद येथेच किमान तापमान सरासरीखाली असून, तेथे शनिवारी राज्यातील नीचांकी १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ नोव्हेंबरला दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २५ अंशावर दाखल झाले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. हे किमान तापमान १९ अंशाच्या आसपास दाखल झाले होते. किमान तापमानात घसरण झाल्याने मुंबईकरांना पहाटे गुलाबी थंडी जाणवत होती. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईतली थंडी गायब झाली आहे. दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे.
१३ नोव्हेंबर : २३ अंश
१४ नोव्हेंबर : २४ अंश
१५ नोव्हेंबर : २५ अंश
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…