टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहात महाराष्ट्र राज्य सरकारने शनिवार आणि रविवारी मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात दररोज ४०० ते ५०० च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने अशंत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर सातारा शहरातील व्यापाऱ्यांन या अंशत: लॉकडाऊनला विरोध केला आहे. शहरातील खणआळी परिसरात व्यापाऱ्यांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ६ फक्त अत्यावशक सेवा राहणार सुरु…
राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसियां, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान, भाजीपाला, दुकाने, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने यांचा समावेश असेल. तर सार्वजनिक परिवहन सेवेतील ट्रेन, गाड्या, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस या देखील सुरु राहणार आहेत. स्थानिक प्राधिकरणांकडून किंवा शासनाकडून मान्सूनपूर्व कार्यवाहीची कामे, स्थानिक प्राधिकरणाव्दारे देण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. वस्तूंची वाहतूक, कृषी संबंधित सेवा, या सेवा सुरु राहणार आहेत. ई-कॉमर्स, अधिकृत मीडिया, पेट्रोल पंप देखील सुरु राहणार आहेत.
शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मिनी लॉकडाऊन
राज्य सरकारच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात देखील मिनी लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री ५ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत मिनी लॉकडाऊन लागू करण्यात येईल. हे नियम ३० एप्रिलपर्यंत सुरु राहतील.
व्यापारी संघटनेचा विरोध
सातारा जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनला सातारा शहरातील व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या खणआळी परिसरात लॉकडाऊनला विरोध करत निदर्शने केली आहेत. शहरातील दुकाने उघडण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांबाबत जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…