गेल्या आठ जून पासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने राज्यात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही भागात ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. वातावरणात सातत्याने बदल होत आहे.या दिवसांत मशागत पूर्ण होऊन पेरणीची तयारी सुरु होत होती. मात्र पाऊस लांबल्याने मशागतही लांबली आणि पेरण्याही खोळबल्या आहेत. शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. राज्यात पुढच्या ३ दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुंबईत 23 जूनला मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. तर 24 व 25 जूनला मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.कोकणात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी पाऊस पुढच्या वाटचालीसाठी पोषक आहे. हे वारे हळूहळू वाटचाल करत आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक होसाळीकर यांनी सांगितले आहे. मराठवाडामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. काही भागात धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत.
हे सुध्दा वाचा:
आव्हानाला सामोरे जाणे तुमचं-माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे; शरद पवारांनी फुंकले रणशिंग
इतकेच नाहीतर सातारा, सांगली, बीड , सोलापूर, लातूर, नांदेड, नाशिक, अहमदनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी तीव्र उष्णता नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…