बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात चांगलाच दिसून येत आहे. हवामान बदलामुळे राज्यातील पाऊस लांबणीवर गेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकणात २२ जून नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट तर पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व होण्याची शक्यता आहे. तळकोकणातही अद्याप मोसमी पाऊस सुरु झाला नाही. अनेक जिल्ह्यात पावसाअभावी उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. तर दोन दिवसात बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिल्लीत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
बिपरजॉय चक्रीवादळाने राजस्थानमध्ये थैमान घातले आहे. राजस्थानमधील 500 हून अधिक जास्त गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. राजस्थानात 300 मिमी पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. राज्यातील तीन जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. आसाममधील 38000 नागारिकांना पूराचा फटका बसला आहे.
हे सुध्दा वाचा:
औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला, ते तुम्ही पुसणार आहात का; प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल
कोस्टल रोडचे काम 76 टक्के पूर्ण; 13 हजार कोटींच्या घरात खर्च,नोव्हेंबर 2023 पर्यंत काम होणार पूर्ण
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर शाईफेक करून हल्ला
बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात आणि देशात मॉन्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. राज्यात अद्याप मॉन्सून सक्रिय झालेला नाही. दरवर्षी साधारण 15 जून पर्यंत पाऊस राज्यामध्ये पडत असतो, मात्र अद्याप मॉन्सूनची प्रगती ही दक्षिण कोकणच्या पुढे झालेली नाही.
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…