स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारला जाग आली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीच्या नियुक्तीबाबत बैठक घेतली आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज पार पडलेल्या बैठकीत एमपीएससीने 817 जागांची शिफारस केली होती त्याबाबत चर्चा झाली. मात्र, या बैठकीत एसईबीसी प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांना लवकरच नियुक्ती देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ही माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा, नियुक्ती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरवली बैठक
31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, या बैठकीत एमपीएससीने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाली आहे. तसेच एसईबीसीच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, असे सांगतानाच आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील असेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे (Dattatraya Bharane has also said that the vacancies of members will be filled by July 31).
एमपीएससीच्या 817 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. एसईबीसीच्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा दावा यावेळी दत्तात्रय भरणे यांनी केला. तसेच 31 जुलैपर्यंत एमपीएससी आयोगावर 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या बैठकीत 48 एसईबीसीसह 413 विद्यार्थ्यांना लवकरच नियुक्ती देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पावसाचे आगमन; आनंदाच्या जागी दुःखाचे ढग
त्याचबरोबर यूपीएससीच्या धर्तीवर राज्यात एमपीएससी च्या परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही आजच्या बैठकीत अजित पवार यांनी एमपीएससीला दिल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. 15 हजार 717 पदांच्या भरतीची प्रक्रियाही लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भरतीवर बंदी आणली होती. ही पदे भरण्यासाठी ती बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…