महाराष्ट्र

श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारण बाजूला सारावे राष्ट्रवादीची नाव न घेता सरकरावर टीका

टीम लय भारी 

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) फेसबुक पोस्ट करत सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादीने (NCP) आपल्या ऑफीशिअल पेज वरुन देशात सुरु असलेल्या राजकारणावर चिंता व्यक्त केली आहे. देशात महागाई सातत्याने वाढत आहे. मात्र देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. NCP criticize Modi government

कर्नाटकमधील हिजाब प्रकरण, जेएनयूमध्ये श्रीराम नवमीला घडलेले हिंसक कृत्य, महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांचा विषय, हिंदूंनी अधिक मुलं जन्माला घालावीत अशी विधाने, याद्वारे समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.

मार्च २०२२ महिन्यामध्ये घाऊक महागाईचा वार्षिक दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. हा दर मार्च २०२१ मध्ये ७.८९ टक्के होता. याचा अर्थ घाऊक बाजारातील महागाई मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. नैसर्गिक वायू, पेट्रोलियम उत्पादने, खनिज तेल, मूलभूत धातू इत्यादीच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम एकूणच सर्व स्तरातील महागाईवर झाला आहे.

पण या सर्व गदारोळात सर्वधर्मीय जनता महागाईमध्ये होरपळली जातेय. या धर्मांध राजकारणामुळे मूळ गंभीर विषयांना बगल दिली जात आहे. त्यामुळे आता जनतेनेच धार्मिक मुद्द्यांकडे लक्ष न देता महागाईवर सातत्याने केंद्र सरकारला प्रश्न विचारत राहिले पाहीजे. या पोस्ट मध्ये कोणाची नाव घेता राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

मुंबईत दंगली घडाव्यात हा भाजपचा उद्देश होता का? राष्ट्रवादीचा जोरदार घणाघात

BJP trying to create a communal situation in India, says NCP chief Sharad Pawar

Shweta Chande

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

8 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

8 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

8 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

8 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

10 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

10 hours ago