गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची (Gangapur dam) तब्बल २ कोटी १५ लाख ८८ हजार लिटरने पाणी क्षमता वाढली (water capacity increased) आहे. आतापर्यंत १७५० हायवा ट्रक व १९९ ट्रॅक्टर च्या माध्यमातून तब्बल २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला असून, पुढील १५ जुनपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे.जलसमृद्ध नाशिक अभियानाअंतर्गत भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थांच्या पाठबळाच्या आधारे ही मोहिम राबविली जात असून १४ व्या दिवशी १६२ हायवा ट्रक व ८ ट्रॅक्टर माती काढण्यात आली.(Gangapur dam’s water capacity increased by 2 crore litres)
जवळपास १९६८ क्युबिक मीटर गाळाचा १४ व्या दिवशी उपसा करण्यात आला. धरणातून काढलेला गाळ आजुबाजुच्या शेतकऱ्यांना मोफत दिला जात असून, यामुळे जमीनीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, या मोहिमेसाठी शहरातील सर्वच प्रमुख संस्था, संघटना आणि फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, त्यासाठी आर्थिक सहाय्य दिले आहे. ही मोहिम जिल्ह्यातील अन्य धरण, तलाव, गांव तळे येथे देखील राबविली जाणार आहे. जुनपर्यंत ही मोहिम राबविली जाणार असल्याने, मोठ्या प्रमाणात धरणांची पाणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी 744 744 37 33 व 744 744 37 66 या क्रमांकावर संपर्क साधावा व आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 च्या वतीने करण्यात आले आहे
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…