चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty’s wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर वारकऱ्यांनी गजबजला.त्र्यंबक नगरीत शनिवारी चैत्र महिन्यातील एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून १५ हून अधिक दिंड्या दाखल झाल्या.दुपारी संत निवृत्तीनाथ समाधी तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना चंदनाची उटी लावण्यात आली. रात्री उशीराने ही उटी भाविकांना प्रसाद स्वरुपात देण्यात आली.(Ooty’s wari celebrations in Trimbak in full swing)
त्र्यंबक नगरीत शनिवारी चैत्र महिन्यातील एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून १५ हून अधिक दिंड्या दाखल झाल्या.चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला विशेष महत्व आहे. उटीवारीसाठी कडाक्याच्या उन्हात दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या. मंदिर परिसर वारकऱ्यांनी गजबजला. दुपारी संत निवृत्तीनाथ समाधी तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला चंदनाच्या उटीचा लेप लावण्यात आला. यावेळी भजन, हरिपाठ झाले. काल्याचे कीर्तन जयंत महाराज गोसावी यांनी केले. काल्याच्या कीर्तनानंतर समाधीवरून उटी उतरविण्यात आली. उटी उतरल्यानंतर ती द्रवरुपात भाविकांना वाटण्यात आली. यासाठी २०० लिटरचे सात ते आठ पिंप देवस्थान परिसरात तयार ठेवण्यात आले होते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान परिसरात पिण्याचे पाणी तसेच अन्य सुविधा करण्यात आली होती.
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…
जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…
शहराच्या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्यावर संशयितांना…
मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…
पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…
मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…