राज्यभरात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचा वापर वाढला आहे. तर दुसरीकडे तापमानामुळे जलस्तर घटत असून नाशिक जिल्ह्यातील जलसाठा (water storage) देखील खालावला आहे. जिल्ह्यातील सर्व २४ प्रकल्प मिळून केवळ १६.३७ टक्के जलसाठा (water storage) शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट (Water scarcity crisis) आणखी गडद झाले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (gangapur Dam) आज २८ टक्के पाणी शिल्लक असल्याने पाऊस लांबला तर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर(Water scarcity crisis ) होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.(Water scarcity crisis continues; The district has 16.37 per cent water storage)
तसेच ओइरखेड, पुणेगाव, माणिकपुंज ही धरणे कोरडी झाली आहेत. मान्सून प्रगतिपथावर असल्यामुळे हा प्रश्न काही दिवसांचा असल्याचे चित्र आहे.दरम्यान, जर हा जूनमध्ये बरसणारा पाऊस लांबला अथवा जुन महिना कोरडा गेल्यास हाच पाणीप्रश्न गंभीर रुप धारण करेल. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढणार आहे.
जिल्ह्यातील धरणसाठा
गंगापूर २८.१० टक्के, कश्यपी २३.५४ टक्के, गौतमी गोदावरी ११.०८ टक्के, पालखेड ८ १२ टक्के, दारणा २२.५१ टक्के, भावली ०.८४ टक्के, मुकणे १३.८७ टक्के, वालदेवी ६.७१ टक्के, नांदूर मध्यमेश्वर ९८.४४ टक्के, चणकापूर ४.८६ टक्के, हरणबारी ८.०६ टक्के, केळझर १.०५ टक्के, गिरणा २०.५८ टक्के
चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…
आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि शॅम्पूचा वापर करतो.…
अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…
बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…
आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…