महाराष्ट्र

पावसाने राज्याला झोडपले; आजही मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात विविध भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, अंबरनाथ, कर्जत, कसारा, सगळीकडे जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये पाणी भरले आहे. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या. आणि  दुकानात, घरात पाणी शिरले. एकीकडे बळीराजा सुखावला तर दुसरीकडे शहरी भागांतील नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर पावसाचा जोर 30 जून पर्यंत कायम राहणार अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे.

पावसामुळे नवी मुंबईमध्ये एनआरआय सोसायटीमधील संरक्षक भिंत कोसळली आहे. यामध्ये तीन कारचे नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये फक्त 2424 टन भाजीपल्याची आवक झाली असून पावसामुळे भाजीपाला खराब होत आहे. आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. अनेक भाज्यांचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. मागील काही तासांपासून ठाण्यामध्ये 105 मिमी पाऊस झाला आहे. ठाण्यातील गुन्हे शाखेचे आणि वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाणी शिरले हे पाणी पंपाद्वारे  उपसण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, मोहाने, आणि जांभूलपाडा येथे उल्हास नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. भिवंडीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या सतत धो धो पडणाऱ्या पावसामुळे ट्रेन 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत.

पालघर जिल्ह्याला पावसाने मागील तीन दिवसांपासून झोडपून काढले आहे. पालघर जिल्ह्यात बुधवारी सरासरी 65. 64 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई-अहमदनगर महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. पाऊस आणि वारे यामुळे उधानाच्या लाटा बंधाऱ्याला धडका देऊ लागल्याने किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच आत्ता पर्यंत जिल्ह्यामध्ये 685.19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हे सुद्धा वाचा:

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली

पुण्यातील तरुणीला हल्यापासून वाचवणाऱ्या तरुणांवर कौतुकाचा पाऊस

सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण

मोनाली निचिते

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

1 second ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

1 hour ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

2 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

3 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

3 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

3 hours ago