महाराष्ट्र

शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता त्यातच निवडणूक आयोगाच्या नोटीसांमुळे मुख्याध्यापक त्रस्त

मुंबई मध्ये बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये नव्याने शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच मुख्य निवडणूक आयोगाने राज्य पातळीवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निवडणूक कामासंदर्भातील पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना अनेक ठिकाणी पाठवण्यात आले आहे. यामुळे मुख्याध्यापकांच्या चिंता आता वाढली आहे.

अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आणि विद्यार्थांची संख्या जास्त आहे. अशातच सर्व शिक्षकांना निवडणूक ड्यूटी लागल्यामुळे शिक्षकही व्यस्त झाले आहेत. यामुळे यापुढे शाळा काशी चालवावी असा मोठा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने निवडणूक कार्यकारी अधिकारी यांचे पत्र सर्व शाळांतील शिक्षकांना मुख्याध्यापकां व्दारा देण्यात आलेले आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 13 ब (2) व कलम 32 यानुसार हे पत्र देण्यात आलेले आहे. यापत्रात दिलेल्या आदेशा नुसार निवडणुकीचे काम करताना शाळेचे कामकाज सांभाळून मतदार यादीचे काम सुद्धा शिक्षकांना करावे लागणार आहे. या निवडणूक कामाची टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 132 नुसार कार्यालय प्रमुख तसेच संबंधित अधिकारी हे शिक्षेसाठी प्राप्त राहतील अशी सूचनाही या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे. यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक दोघांच्याही डोक्याची चिंता वाढली आहे.

हे सुध्दा वाचा:

संत निवृत्तीनाथांच्या पालखीने केला 339 किमीचा प्रवास; संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटी मुक्कामाला

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड बाजारात लाखोंची उलाढाल

राज्याचे तीन मंत्री एक आमदार संजय राऊत यांच्या रडारवर

शिक्षकांची न झालेली भरती, शाळांवर अपुरे शिक्षक आणि त्यात शाळा सुद्धा नुकत्याच सुरू झाल्यामुळे प्रथम घटक चाचणी परीक्षा सुद्धा झाल्या नाहीत. त्यामुळे निवडणुकीचे काम करून अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. निवडणूक, जनगणना आणि नैसर्गिक आपत्ती यातून शिक्षकांची सुटका होणार नाही. यामुळे शिक्षक निवडणूक कामासाठी हजर होणार पण अध्ययन – अध्यापन प्रक्रिया निवडणुकीचे काम करताना काशी पार पडणार? असा प्रश्न शिक्षक व मुख्याध्यापक विचारात आहेत.

मोनाली निचिते

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

2 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

2 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

2 hours ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

3 hours ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

3 hours ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

3 hours ago