लय भारी न्यूज नेटवर्क
पुणे : कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत दिवे घाटात जेसीबी घुसल्याने दोन वारक-यांचा मृत्यू झाला. पंधरा वारकरी जखमी झाले. संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी अशी मृत्यू झालेल्या वारक-यांची नावं आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
संत नामदेव महाराज यांची पालखी दरवर्षी निघत असते. दरवर्षी हजारो वारकरी यामध्ये सहभागी होतात. पंढरपूरवरून आळंदीला पालखी परत येत असताना दिवे घाटात आज सकाळी अपघात झाला. पालखी दिवेघाटात असताना जेसीबी अचानक या पालखीत घुसली. त्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. पंधरा जण जखमी आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत.
पालखीला पोलीस बंदोबस्त दिला नव्हता. दरवर्षी पोलीस बंदोबस्त मागितला जातो परंतु पोलीस आमच्या मागणीचा विचार करत नाहीत. जर पोलीस बंदोबस्त मिळाला असता तर आमच्या दोन वारक-यांचे जीव गेले नसते. पंधरा वारकरी जखमीही झाले नसते. असा आरोपही पालखीच्या आयोजकांकडून करण्यात आला.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…