महाराष्ट्र

‘लाल वादळ’ मुंबईत दाखल, मोदी सरकारविरुद्ध शेतक-यांचा एल्गार

केंद्र सरकाच्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी राजभवनावर धडकणार

टीम लय भारी

मुंबई : केंद्र सरकारच्या ( Modi Government ) तीन नव्या कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (Red Storm) सुरू आहे. आपल्या मागण्यांवर ठाम राहत शेतकरी कडाक्याच्या थंडीतही ठाण मांडून बसलेले आहेत.

या शेतक-यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्रातील शेतक-यांनी एल्गार पुकारला असून मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांतून हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात एकवटू लागले आहेत. या आंदोलनात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा शेतक-यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोप-यातून शेतकरी, कामगार मुंबईतील आझाद मैदान येथे जमले आहेत. नाशिक येथून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे १५ हजार शेतकरी मार्गस्थ झाले होते. हे शेतकरी रविवारी सायंकाळी आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर शेतक-यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. उद्या राजभवनावर हे शेतकरी मोर्चा नेणार आहेत.

आझाद मैदानात शेतक-यांचे हे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचाही पाठिंबा असून आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शेतक-यांना कोणतीही आडकाठी येणार नाही, अशी काळजी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात भव्य असा मंडपही उभारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान राजभवनावर मोर्चाने जाऊन शेतकरी प्रतिनिधी मागण्यांचे निवेदनही राज्यपालांना देणार आहेत. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानात ध्वजारोहणही केलं जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या मोर्चाबाबत एक ट्वीट करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चाला उद्या (२५ जानेवारी) संबोधित करणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सुद्धा मोर्चात सहभागी होतील व मोर्चाला मार्गदर्शन करतील, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोर्चेक-यांशी संवाद साधणार, असे सांगितले जात असले तरी ते नेमके केव्हा आझाद मैदानात येणार हे मात्र अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

दरम्यान, या मोर्चामध्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना राज्यभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

15 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

15 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

16 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

16 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

17 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

19 hours ago