टीम लय भारी
मुंबई :- महिला दिनाच्या शुभ मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी अमृता फडणवीसांच्या गाण्याचे कौतुक केले आणि टोला देखील हाणला आहे. अमृता फडणवीस या नेहमीच नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असतात. त्यांचा आवाज बेसुर आहे अशी टीका केली जाते. पण रोहित पवारांनी थेट तसा उल्लेख न करता अमृता फडणवीस यांना टोला हाणला आहे. अमृता फडणवीसांचा प्रयत्न चांगला आहे असे रोहित पवारांनी कौतुक केले आहे. पण मिळालेल्या संधीचा ‘काहीजणां’ना फायदा घेता येत नाही असे नमूद करीत फडणवीस यांना डिवचले आहे.
रोहित पवार म्हणाले, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असे नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांना उत्सुकता असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी प्रदर्शित झाले. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे.
अमृता फडणवीसांचे इंग्रजी गाणे
अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणे ही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवे गाणे पोस्ट केले आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीने हे मूळ गाणे गायले आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचे ही दाखवण्यात आले आहे. हेच गाणे आता अमृता फडणवीस यांनी गायले आहे.
अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजे निमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…