महाराष्ट्र

पेशवे हे दुष्ट, नीच प्रवृत्तीचे होते; भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य, समाज माध्यमात नेमाडे यांच्यावर टीका

ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी विविध ठिकाणी केलेली भाषणे आणि दिलेल्या मुलाखतीत तत्कालीन ग्राम व्यवस्थेचे केलेले समर्थन आणि एकूणच मांडणीमुळे ते संघाच्या दावणीला बांधले गेले की काय, अशी शंका पुरोगामी मंडळींना होती. पण परवा (५ ऑगस्ट) मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नेमाडे यांनी, ‘पेशवे हे दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचे होते,’ असे वक्तव्य केले. एवढंच काय याच कार्यक्रमात ‘औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता, पहिल्यांदा सतीची चाल औरंगजेबाने बंद केली होती,’ असेही नेमाडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे समाज माध्यमात ‘हिंदू’वाले नेमाडे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तर नेमाडे समर्थकही ‘नेमाडे सर’ यांची बाजू लावून धरत आहे.

मी विद्यार्थी असताना आणि एम. ए. करत असताना मुंबई विद्यापीठात मी येऊन बसत असे. मराठीत मी नापास होणार होतो म्हणून मी तो विषय सोडला आणि इंग्रजी विषय निवडला. पण मराठी भाषेविषयी मला प्रेम होतं म्हणून मी येऊन बसायचो. इथे अनेक पुस्तकं माझ्या वाचनात आली. त्यावेळी मी नाटक लिहिण्याचं मनावर घेतलं होतं. दुसऱ्या बाजीरावावर मला नाटक लिहायचं होतं. वा. सी. बेंद्रे इथेच बसत असायचे. त्यांच्याकडे आम्ही चर्चेसाठी जायचो. काय वाचायचं त्याचा सल्ला घ्यायचो. पेशवे दप्तर वाचा इथे खूप आहे असं त्यांनी मला सुचवलं होतं. त्यावेळी मी इतिहास वाचला आणि माझ्या लक्षात आलं की आत्तापर्यंत जो काही इतिहास आपण वाचत आलो तो काही खरा नाही. आपण खऱ्या पद्धतीने दुसऱ्या बाजीरावावर लिहिलं पाहिजे. दुसरा बाजीराव हा खूप मोठा माणूस होता कारण त्याने पेशव्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात दिला. पेशवे हे दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते सगळे. उदाहरण द्यायचं झालं तर मी नानासाहेब पेशव्यांचं देईन. तरुणांना मी आज हे सांगू इच्छितो की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणं कठीण आहे त्यामुळे पुस्तक वाचलं की सत्य कळतं. असंही यावेळी नेमाडे यांनी म्हटलं आहे. नानासाहेब पेशवा कुठेही गेला की त्याचं पत्र असायचं तो कुठेही गेला की त्यांचा गोविंदपंत बुंधेले हा त्यांचा सरदार होता त्याला हे पत्र लिहून सांगायचे मी या या दिवशी अमुक अमुक ठिकाणी येणार आहे. आठ ते दहा वर्षांच्या दोन शुद्ध आणि सुंदर मुली तयार ठेवाव्यात असं पत्र आहे मी ते वाचलं आहे. आठ ते दहा वर्षांच्या मुली, हा माणूस (नानासाहेब पेशवे) ४०-४२ वर्षांचा. हा त्या कशासाठी तयार ठेवायला सांगायचा? हा त्यांना मारायचा की अजून काही करायचा ते माहित नाही, असेही नेमाडे यांनी म्हटले आहे. अशा या पेशव्यांच्या तावडीतून आपण सुटलो ते फार बरं झालं असं मी बेंद्रे यांना सांगितलं. तेव्हा बेंद्रे संतापले, इंग्रजांकडे महाराष्ट्र जाणं चांगलं आहे का? त्यावर मी त्यांना म्हटलं की आम्ही लिळाचरित्र ऐकून मोठे झालो. तुकाराम ऐकता ऐकता आमचा जन्म गेला. चक्रधर स्वामी आणि तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोण आहे जगात? त्यांचा आदर्श आम्ही ठेवला. त्यामुळे खरं आहे ते आम्ही पाहिलं. इंग्रज त्यांच्यामुळेच आले. पेशव्यांच्या बदमाशीमुळेच इथे आले. इंग्रजही बदमाशच होते पण आपल्यापेक्षा कमी होते असंही नेमाडे यांनी म्हटलं आहे.

औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट
करण्यात आल्याने त्याने मंदिर फोडलं

औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या. तुम्हाला माहित आहे शाहजानची आई हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या आल्याच नाहीत परत. छावणीतले लोक म्हणाले की माहित नाही. मग औरंगजेबाला हे समजलं की तिथले जे पंडे होते ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे. इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं. पुस्तकं वाचूनच हे कळतं. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालायात तुम्ही आलात पुस्तकं वाचलीत की तुम्हाला खरं काय ते कळेल. बाहेर चाललेलं खोटं असतं. असंही नेमाडेंनी म्हटलं आहे. सगळ्या जुन्या गोष्टी इथेच कळतात. शिवाजीचा विश्वासू सहकारी मुसलमान होता. शिवाजीच्या बरोबर शेवटपर्यंत त्याचा विश्वास असणारा सहकारी मदारी मेहेर होता. स्वतःच्या लोकांवर शिवाजीचा विश्वास नव्हता. औरंगजेबाचा सेनापती जयसिंग ज्याने शिवाजीला पकडून दिलं तो हिंदू होता. औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. निम्म्याहून जास्त हिंदू सरदार त्याच्या काळात वाढले आहेत मग तो हिंदू द्वेष्टा वगैरे होता कसं म्हणता येईल? सतीची चाल पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेब होता. इतिहासा बेटिंगचं नाव असतं. पहिल्यांदा सतीची चाल औरंगजेबाने बंद केली होती, असेही नेमाडे यांनी म्हटले आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

10 mins ago

Dhangar Reservation | पंढरपूरमधील उपोषणकर्त्यांचा शिंदे सरकारला इशारा | फडणवीस यांच्यावर संताप

पंढरपूर मध्ये धनगरपंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Strikers in Pandharpur…

55 mins ago

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी करा ‘हे’ एरोबिक्स व्यायाम

मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते.…

1 hour ago

महायुती सरकारच्या चुकांमुळे राज्यातील आणखी प्रकल्प गुजरातला गेला: विजय वडेट्टीवार यांचा हल्ला

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एकही प्रकल्प आला नाही आहे. यातच आता महाराष्ट्रात येणारा आणखी एक…

2 hours ago

SanjayMama Shinde मतदारसंघात महिन्यातून एकदा येतात | दादागिरी, गुंडगिरीत एक नंबर आमदार

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

16 hours ago