पोलीसांची निर्मिती इंग्रज्यांच्या काळात शासन करण्यासाठी झाली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर पोलीस दलात अमूलाग्र बदल करण्यात आला असून पोलीस शासन करण्यासाठी नव्हे तर जनतेच्या रक्षणासाठी आहे. सद्यस्थितीत पोलीस दलाचा आकृतीबंध तयार करण्यात आला असून लवकरच नव्याने भरती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी आ. सिमा हिरे यांनी ५ रू.चा कोटी चा निधी मंजूर केल्याने फडणवीस यांनी त्याचे कौतुक केले.
सातपूर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवरी (दि.१०)सातपूर येथे करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे ,आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ,उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि,दोन पोलीस ठाण्यांमध्ये किती अंतर असावे त्यात किती संख्या असावी याचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस दलात आजही 1970 पासूनचे संख्याबळ कायम होते. मात्र कालांतराने संख्या वाढत गेली गुन्ह्यांच्या स्वरूपात बदल होत गेला त्यामुळे पुन्हा नव्याने भरती करण्यात येणार आहे. सामान्य सुरक्षित वाटावे व गुंडा गर्दी करणाऱ्या गुंडांची हिंमत होऊ नये अशा वातावरणाची पोलीस आयुक्तांनी निर्मिती करावी असा सल्ला यावेळी फडणवीस यांनी दिला. यावेळी यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, माजी नगरसेवक राकेश दोंदे,भगवान दोंदे,डॉ. वैभव महाले,राकेश ढोमसे,राम पाटील,छाया देवांग, माजी नगरसेवक सलीम शेख, माजी नगरसेविका माधुरी बोलकर आदीसह भाजपा पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आ. सिमा हिरे यांनी, सुत्रसंचलन रश्मी हिरे बेंडाळे यांनी तर आभार उपायुक्त मोनिका राऊत यांनी मानले.
या कामांचे लोकार्पण व उदघाटन
सातपूर पोलीस ठाण्याची नवीन इमारत पाच कोटी रुपये
बालाजी मंदिर भव्य भक्ती निवास नऊ कोटी रुपये
सोमेश्वर धबधबा गोदावरी नदीवरील पूल बांधणे दहा कोटी रुपये
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान १६.५ कोटी
सीसीटीव्ही बसवणे १.२ कोटी आदि कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते करण्यात आला.
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…