अजित पवार यांनी विरोधीपक्षनेत्याचा राजीनामा देऊन आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील त्यांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देणयात आले असून राष्ट्रवादीत राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकीकडे जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंबंधीची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. तर अजित पवार यांनी देखील आम्हीच राष्ट्रवादी म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच पक्षप्रतोद जयंत पाटील यांची हकालपट्टी केल्याचे पत्र काढले आहे.
दरम्यान अजित पवार यांनी राज्याच्या प्रशासकीय कारभारात लक्ष घातले असून त्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील उपस्थिती लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले असून हे धोरण जाहीर करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. त्याच बरोबर मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा परदेशी शिष्यवृत्तीचा निर्णय अनेक दिवस प्रलंबित होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रश्न मार्गी लावण्यात आला.
त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता देण्यात आली. नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्यासंबंधीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे सुद्धा वाचा
डॉ. अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा; शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट
राणादाचा शिंदे गटात प्रवेश, अनेक मराठी कलाकारही उपस्थित
शरद पवारांच्या आडून आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला अजित पवारांचा आक्षेप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कबूलायतदार गावकर जमिनींबाबतची समस्या मोठी आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय घेण्यात आला.
नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र उभारण्याबाबत मंजूरी देण्यात आली. त्याचबरोबर मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे करण्यात आली असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…
ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…
पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…