मुंबई

पवईत विकेंड लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद

टीम लय भारी

मुंबई  :- महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. त्याची १० व ११ एप्रिल रोजी विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली असता पवईतील व्यापारी वर्ग व जनतेने उस्फुर्त असा प्रतिसाद दिलेला दिसत आहे.

पवईतील हिरानंदानी संकुल, आय.आय.टी मार्केट आणि मेनगेट या विभागात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग व्यवसाय करत असतात आणि आय.आय.टी मार्केट लगत असलेला कामगार नाका देखील नेहमी गजबजलेल्या असतो परंतु या विकेंड लॉकडाऊनचे पुर्णतः पालन करीत शुकशुकाट दिसून आला.

कामगार नाक्यावर हातावर पोट असणारे पवईतील नागरिक कामाच्या शोधात तासनतास वाट बघत असतात त्यात विकेंड लॉकडाऊन लागल्याने एकीकडे नैराश्य जरी आले असले तरी राज्यातील जनतेच्या आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तिच्या हितासाठी आम्ही याचे पालन करत आहोत असे कामगार नाक्यावरील नागरिकांनी आमच्या सोबत बोलताना सांगितले.

पवई अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण पणे कडकडीत विकेंड लॉकडाऊन पालन झाल्याचे आज दिसून आले. परंतु अत्यावश्यक सेवेत भाजीपाला दुकाने चालु ठेवण्यासाठी सरकार कडून आदेश आले असताना देखील आय.आय.टी मार्केट लगत भाजी मंडई मध्ये पुर्णतः शुकशुकाट दिसून आला. भाजीपाला दुकाने उघडी नसल्याने नागरिकांनमध्ये नैराश्य दिसून येत आहे. असे आमच्याशी बोलताना पवईतील युवक राहुल गच्चे यांनी सांगितले.

विकेंड लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारने दिलेल्या नियमानुसार जीवन आवश्यक सेवेमध्ये जर भाजीपाला दुकाने सुरू ठेवण्यासाठी सांगितले असता. भाजीपाल्याचे दुकान खुले का नाही सामान्य लोकांना भाजीपाल्यासाठी त्रास होतो.
-राहुल गच्चे (पवईतील युवक व समाजसेवक)

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago