टीम लय भारी
मुंबई : कांदिवलीत एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने (Crime) एकच खळबळ उडाली आहे. कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरातील खान गल्लीत गुरुवारी (दि. 3) सायंकाळी सहा वाजण्याच्या ही धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय अजगर अली जब्बार अली नावाच्या वडिलांनी दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे.
कैनन (वय 12) आणि सुजैन (वय 9) असे हत्या झालेल्या दोन मुलींची नावे आहेत, तर अजगरअली जब्बार हा लोहार काम करत असत. सायंकाळी घरी आल्यानंतर त्याने मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना एकूण 4 मुली आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तेव्हा अजगरअली हा दोरीच्या साह्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच एक मुलगी जमिनीवर तर दुसरी मुलगी ही खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…
राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…
कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…