टीम लय भारी
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली (Good News) आहे. तलाव क्षेत्रात तब्बल १२ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा होईल एवढा जलसाठा आता तलावांमध्ये आहे.
जुलै अखेरीस तलाव क्षेत्रात केवळ ३४ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने महापालिकेने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू केली. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने मुंबईसह तलाव क्षेत्रात चांगलाच जोर धरला. सर्व तलाव काठोकाठ भरल्यामुळे पालिका प्रशासनाने ऑगस्टअखेरीस २० टक्के पाणीकपात मागे घेतली.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तलाव क्षेत्रात १४ लाख ३० हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला. आतापर्यंत तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहिले. तर अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा काठोकाठ भरले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…