टीम लय भारी
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अपर जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय राज्य सरकारने अखेर गुरूवारी सायंकाळी उशिरा जारी केला आहे. त्यानुसार तब्बल ६१ उप जिल्हाधिकाऱ्यांना या पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे.
पदोन्नती झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव गजानन पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खासगी सचिव रामदास खेडकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे खासगी सचिव चंद्रकांत थोरात, जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव रविकांत कटकधोंड यांचाही समावेश आहे.
अपर जिल्हाधिकारी पदाच्या एकूण १०५ रिक्त जागा होत्या. त्यापैकी सर्वसाधारण गटासाठी ६५, तर आरक्षित गटासाठी ४० जागा निश्चित केल्या होत्या. यापैकी सर्वसाधारण गटातील (६५ पैकी) ६१ जागांवर पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली आहे. आरक्षित गटातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत असलेला घोळ अद्याप संपलेला नाही. त्यामुळे आरक्षित ४० पदांची यादी अद्याप जाहीर केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे
हे सुद्धा वाचा
मुख्यमंत्र्यानी केल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…