लयभारी न्यूज नेटवर्क
मुंबई : औरंगाबाद जि.प.निवडणुकीचा वाद मातोश्रीवर पोहोचला आहे. सोमवारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार व मराठवाडयातील शिवसेना नेत्यांच्या बैठकीचे आयोजन मातोश्री निवासस्थानी करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसमोर सायंकाळी ५ : ३० वाजता शिवसेना नेत्यांना जिपच्या राजकारणातील पराभवाचे उत्तर द्यावे लागणार आहे. यामुळे सर्वांच्या नजरा मातोश्रीवरीच चर्चेकडे लागले आहे.
राज्यमंत्री सत्तार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात रविवारी २० मिनिटे चर्चा झाली. मी नाराज नाही. काम करत राहणार असं सत्तार यांनी उध्दव ठाकरे यांना सांगितले. तसेच सोमवारी सायंकाळी ५ : ३० वाजता पुन्हा आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी येणार आहोत. अशी माहिती राज्यमंत्री सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शनिवारी राज्यमंत्री सत्तार यांनी माझं रिमोट कंट्रोल मातोश्रीवर आहे. त्यामुळे मला काय बोलायचं मी मातोश्रीवर बोलणार असं सांगितलं होतं. त्यामुळे औरंगाबादमधील शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांच नेतृत्व सत्तारांना मान्य नाही हे स्पष्ट होत आहे.
शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जि.प. निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवाराविरोधात काम केले. त्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार उपनेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांच्यावर सडकून टीका केली होती. या सर्व वादानंतर (रविवार ५ जानेवारी ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतली. भेटीदरम्यान संपूर्ण प्रकरणाची व माझ्या राजीनाम्याची पूडी कुणी सोडली याबद्द मी सविस्तर माहिती उध्दव ठाकरेंना दिली. अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
औरंगाबाद जि.प.मध्ये शनिवारी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात राज्यमंत्री सत्तार यांनी शिवसेनेच्या विद्यान जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना पुन्हा मैदानात उतरवले होते. भाजप व सत्तार समर्थकांच्या भरवशावर वाद निर्माण झाला होता. काँग्रेसच्या मिना शेळके व शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी ३० मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली होती. यात काँग्रेसच्या शेळके विजयी ठरल्या. उपाध्यक्षासाठी भाजपचे लहानू गायकवाड व शिवसेनेच्या शुभांगी काजे यांच्यातील लढतीत महाविकास आघाडीची दोन मते फुटल्याने भाजपचा विजय झाला. यामुळे शिवसेनेचे माजी खासदार यांनी राज्यमंत्री सत्तार हे गद्दार आहेत. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही. असं विधान केलं होतं. त्यामुळे शिवसेनेमध्ये दुफळी असल्याचे समोर आले होते.
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…