मुंबई

ठाकरे सरकारला जमले नाही, ते मनसेने ‘करून दाखविले’

टीम लय भारी

मुंबई : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने एक मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे परदेशात अडकलेल्या तब्बल २ हजार मराठी तरूणांना आपल्या राज्यात परत येणे शक्य झाले आहे ( MNS helped Marathi students ). मनसेच्या या कामाबद्दल जनतेमधून कौतुक करण्यात येत आहे.

परदेशात अडकलेल्या या मराठी तरूणांना आणण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करणे अपेक्षित होते. परंतु हे काम मनसेने ‘करून दाखविले’ आहे, अशा शब्दांत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे ( Shalini Thackeray scathing to Thackeray Government ) यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

किरगिजीस्तान या देशात शिक्षणासाठी गेलेले हे तब्बल दोन हजार विद्यार्थी गेल्या चार महिन्यांपासून तिथेच अडकून पडले होते. किरगिजीस्तानची राजधानी बिष्केक येथे हे सगळे विद्यार्थी होते. त्यांना महाराष्ट्रात परत यायचे होते.

हे सुद्धा वाचा

सरकारने ‘Unlock’ येत्या ३१ जुलैपर्यंत वाढविला; वाचा नवे निर्बंध, नव्या परवानग्या

Coronaeffect : रुग्णालयातील भयावह परिस्थिती पाहून मनसे नेता रडला!

सावधान : विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई!

या तरूणांना परत आणण्यासाठी शालिनी ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. एवढेच नव्हे तर, मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील व शालिनी ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती ( MNS delegation was met to Governor Bhagat Singh Koshyari ).

कोश्यारी यांच्याकडे मनसेने या तरूणांची व्यथा मांडली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. बिष्केकमधील भारतीय दुतावासाकडून त्या मराठी तरूणांना अगोदर सहकार्य केले जात नव्हते. नंतर मात्र दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली.

मनसेच्या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारने या मराठी तरूणांसाठी दोन विमानांची तजवीज केली. ही दोन्ही विमाने सोमवारी दुपारी बिष्केकमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. लवकरच हे मराठी तरूण मायभूमीत पोचतील, आणि त्यानंतर आपापल्या घरी रवाना होती, अशी माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

‘मनसे’ने केलेल्या या मदतीबद्दल संबंधित मराठी तरूणांनी राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे, राजू पाटील, शालिनी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

11 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago