मुंबई

MNS Protest : गरिबांची घरे श्रीमंतांना विकली! मनसेतर्फे हिरानंदानी समुहाविरोधात पवईत आंदोलन

टीम लय भारी

मुंबई : उपनगरातील अत्यल्प उत्पन्न गटाकरिता हिरानंदानी समुहाकडून घरे उभारण्यात आली होती. दरम्यान, या समुहाकडून घरे उभारणीत अनियमितता करून गरीब मध्यमवर्गीयांची घरे स्वस्त दरात उच्चभ्रू लोकांना विकल्याचा आरोप (Homes of the poor sold to the rich) मनसेने केला आहे. या विरोधात मनसेतर्फे हिरानंदानी समुहाविरोधात पवईत आंदोलन (MNS Protest) करण्यात आले.

गरीब नागरिकांच्या हक्काची घरे श्रीमंतांना विकल्याप्रकरणी मनसेने आज हिरानंदानी समुहावर संताप व्यक्त केला. पक्षातर्फे पवईतील हिरानंदानी परिसरातील ओलंपिया या मुख्य कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणबाजी करण्यात आली. यावेळी हिरानंदानी यांना जाब विचारून निवेदन देण्यात आले. मनसेचे नेते शिरीष सावंत, महिला संघटीका रिटा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मुंबई उपनगरातील गरीब मध्यमवगीर्यांकरिता राज्य शासनाने १९७७ या वर्षी नागरी कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत १०० एकर जागेत पवई विकासयोजना राबवण्यासाठी मान्यता दिली होती. यासंदर्भात एमएमआरआडीए आणि निरंजन हिरानंदानी यांच्यामध्ये करार झाला होता. दरम्यान, अत्यल्प उत्पन्न गटाकरिता घरे बांधने बंधनकारक असताना विकासक हिरानंदानीने मोठ्या आकाराच्या इमारती बांधून त्या उच्चभ्रू लोकांना विकल्या, असा आरोप मनसेने केला आहे. याच्याच निषेधार्थ आंदोलन केल्याचे मनसेचे विभागीय अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाबाबत हिरानंदानी कार्यालयाशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळाली नाही.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

5 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

6 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

7 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

7 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

7 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

9 hours ago