मुंबई l मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर उद्या गुरुवारपासून १० वातानुकुलित लोकल गाड्या धावणार आहेत. या मार्गावर केवळ अधिकृत परवाना असलेल्या प्रवाशांनाच प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचं सविस्तर वेळापत्रकही मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे.
मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर सध्याच्या सेवेऐवजी उद्यापासून १० वातानुकुलीत लोकल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
सोमवार ते शनिवार या दिवशीच या गाड्या धावणार असून प्रत्येक स्थानकात त्या थांबतील. तसेच रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच या मार्गावरुन प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, प्रवासादरम्यान करोनाच्या सर्व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.
नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…
नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…