टिम लय भारी
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपद नेहमीच चर्चेचा विषय बनलं आहे. काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. अशातच काँग्रेस अध्यक्षपदावरून दिल्लीत पक्षातंर्गत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या वृत्तानूसार, राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती आहे.परिणामी, राहुल गांधी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. काँग्रेस पक्षात नेतृत्व आणि व्यापक संघटनात्मक बदल व्हावा यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहलं होतं. बिहार निवडणुकीच्या मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या नेत्यांची शनिवारी दिल्लीत सोनिया गांधींच्या १० जनपथ या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. पत्र लिहणाऱ्या त्या नेत्यांशी सोनिया गांधी स्वत: चर्चा केल्याचं समजतय.
काँग्रेसचं इलेक्टोरल कॉलेज, ऑल इंडिया काँग्रेस समितीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य मिळून योग्य व्यक्तीची निवड पक्षाध्यक्ष म्हणून करतील. राहुल गाधी हेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, ही माझ्यासहीत पक्षातील ९९. ९ टक्के लोकांची इच्छा आहे, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे. ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांच्या सहित काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला सक्रिय अध्यक्षाची गरज आणि व्यापक संघटनात्मक बदल करावा अशी मागणी केली होती. यावर काही काँगेस नेत्यांनी गांधी परिवाराच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती.
पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस अध्यक्षपद नेहमीच चर्चेचा विषय बनलं आहे. काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. अशातच काँग्रेस अध्यक्षपदावरून दिल्लीत पक्षातंर्गत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या वृत्तानूसार, राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती आहे.परिणामी, राहुल गांधी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. काँग्रेस पक्षात नेतृत्व आणि व्यापक संघटनात्मक बदल व्हावा यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहलं होतं. बिहार निवडणुकीच्या मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या नेत्यांची शनिवारी दिल्लीत सोनिया गांधींच्या १० जनपथ या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. पत्र लिहणाऱ्या त्या नेत्यांशी सोनिया गांधी स्वत: चर्चा केल्याचं समजतय.
काँग्रेसचं इलेक्टोरल कॉलेज, ऑल इंडिया काँग्रेस समितीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य मिळून योग्य व्यक्तीची निवड पक्षाध्यक्ष म्हणून करतील. राहुल गाधी हेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, ही माझ्यासहीत पक्षातील ९९. ९ टक्के लोकांची इच्छा आहे, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे. ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांच्या सहित काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला सक्रिय अध्यक्षाची गरज आणि व्यापक संघटनात्मक बदल करावा अशी मागणी केली होती. यावर काही काँगेस नेत्यांनी गांधी परिवाराच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…