मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे राजकीय वातावरण आणि शिवसैनिक चांगलंच तापलं आहे. मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी (Sanjay raut) गर्दी केली असून राणा दांपत्याला तोडीसतोड उत्तर देण्याची तयारी केली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे. (Sanjay raut criticize on navnit rana and ravi rana)
‘बंटी आणि बबली’ मुंबईत पोहोचले असतील तर पोहोचू द्या. हे फिल्मी लोक आहेत. ही स्टंटबाजी, मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आणि भाजपाला आपलं मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत, असं संजय राऊतांनी (Sanjay raut) राणा दांपत्यावर खडसावून टिका केली.
हनुमान चालीसा वाचणे हा श्रद्धेचा विषय आहे, पण भाजपने हिंदुत्वाची नौटंकी करून ठेवली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा ही याच नौटंकीमधील पात्र आहेत. परंतु, भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीला जनता गांभीर्याने घेत नाही. हनुमान जयंती आणि रामनवमी हे सण आम्ही तुमच्यापेक्षा मोठ्याप्रमाणात मुंबईत साजरे करतो. त्यामुळे भाजपने आम्हाला शिकवू नये. असेही संजय राऊत (Sanjay raut) यांनी म्हटले.
ED’s action on Sanjay Raut is right, says Maharashtra MP Navneet Rana
नागपूरात कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन
वाचा मौनस्य श्रेष्ठम्, अमोल मिटकरींचं ट्वीट
ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…
सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…
येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…
उध्दव सेनेने उमेदवारी देण्याचा वर्षभरापूर्वीच शब्द दिला आणि ऐनवेळा शब्द फिरवला असा आराेप करीत अखेरीस…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (University) संलग्नित महाविद्यालयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या…
शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना…