मुंबई

ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत देशपातळीवर पटकाविला तिसरा क्रमांक

देशपातळीवरील विविध पुरस्कार ठाणे महापालिकेने पटकावले असताना पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे संपूर्ण भारतात आयोजित केलेल्या स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत ठाणे शहराने देशपातळीवर ३ रा क्रमांक पटकावला आहे.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निवडण्यात आलेल्या १३१ शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांतून ठाणे शहराने देशात ३ रा क्रमांक पटकावला. भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख रक्कम 50 लाख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाअंतर्गत, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 131 शहरांची निवड करण्यात आली होती. स्वच्छ वायु सर्वेक्षण, MOEF&CC चा एक नवीन उपक्रम, हवेच्या गुणवत्तेवर आणि 131 शहरांमध्ये शहर कृती आराखड्यांतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारावर शहरांची क्रमवारी लावण्यात आली. या क्रमवारीसाठी देशभरातून निवडलेल्या एकूण 131 शहरांपैकी 10 लाखांहून अधिक रहिवासी असलेल्या श्रेणी 1 अंतर्गत 47 शहरे, 3 लाख ते 10 लाख लोकसंख्येची श्रेणी 2 अंतर्गत असलेली 44 शहरे आणि तीन लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली श्रेणी 3 अंतर्गत 40 शहरे आहेत. स्वच्छ वायु सर्वेक्षणामध्ये समाजातील सर्व घटकांमध्ये जागरूकता पसरवणे, स्वचछ हवेच्या आरोग्यावरील फलदायी परिणामांबद्दल नागरिकांना माहिती देणे, वेगवेगळ्या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेची तुलना करणे आणि सर्वांसाठी स्वच्छ हवेचे ध्येय साध्य करणे ही उद्दिष्टे आहेत.

शहरांतील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते बांधणी, ई-बस सुविधा, बांधकाम व विनाशक कचरा व्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषण, शहरांतील पीयुसी सुविधा व पीयुसी तपासणी, रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांवर वृक्ष लागवड, ई-वाहन चार्जिग सुविधा, शहरातील एकूण वाहनांच्या तुलनेत ई-वाहनांचे प्रमाण, सीएनजी व पेट्रोल पंपांची संख्या, जनजागृतीचे उपक्रम, इत्यादी घटकांच्या कसोटीवर स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत मुल्यांकन करण्यात आले.
स्वयं-मूल्यांकन आणि तृतीय पक्ष मूल्यांकनाच्या आधारे, स्पर्धात्मक संघवादाच्या भावनेने प्रत्येक गटातील 3 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. शहराची क्रमवारी ही वेगवेगळ्या डोमेनमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या कृतींचे मूल्यांकन करुन करण्यात आली. यात एकूण २०० गुणांपैकी १८५.२ गुण मिळवून ठाणे शहराने देशात ३रा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मध्यप्रदेशातील इंदोर शहराने १८७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून उत्तर प्रदेशातील आग्रा शहराने १८६ गुण प्राप्त करुन दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला आहे.

हे ही वाचा 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री शिंदे

संभाजी भिडे आले सरकारच्या मदतीला धावुन, मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचे केले आवाहन!

मतदान केंद्रांच्या जागेची प्रत्यक्ष पडताळणी मोहीम सुरु, प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांनी संभाव्य मतदार केंद्रांना दिल्या भेटी

चालू वर्षामध्ये शहरामध्ये मियावाकी पध्दतीने वृक्षलागवड करण्यावर भर देण्यात आला. तसेच यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई, एकूण रस्त्यांपैकी काँक्रिट आणि मास्टिक रस्त्यांच्या प्रमाणामध्ये झालेली वाढ त्यामुळे धुळीचे प्रदुषण कमी होण्यासाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थितती, शहरामध्ये मो्ठया संख्येने येत असणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमातंर्गत प्राप्त निधीचा कालबद्ध व गुणवत्तापूर्ण विनियोग या बाबींमुळे ठाणे शहराला हा बहुमान प्राप्त झाला. या माध्यमातून भविष्यामध्ये शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये गॅस आधारित शवदाहिनी निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. तसेच पी.एम ई बससेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणे परिवहन उपक्रमाकडील इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, अशा प्रकारे ठाणेकरांसाठी अधिक आरोग्यदायी वातावरणनिर्मितीमध्ये नक्की हातभार लागेल असे आयुक्त् अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

मिशन लाईफ फॉर एन्व्हायरमेंट

पंतप्रधान महोदय यांनी पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत मिशन लाईफ उद्दिष्ट निश्चित करुन दिले. ‘लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट’ असे त्याचे घोषवाक्य असून पर्यावरण जागरुक जीवनशैलीबाबत ही चळवळ आहे. पर्यावरणाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असून मिशन लाईफ म्हणजे पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक कृतीला चालना देण्यासाठी भारताच्या नेतृत्वाखाली जागतिक जनचळवळ आहे. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

10 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

11 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

12 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

13 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

14 hours ago