Categories: मुंबई

Exclusive : बच्चू कडूंनी कानाखाली मारलेले ते अधिकारी कडूंच्याच खात्यात, अधिकाऱ्यांना आता हवीय बदली

टीम लय भारी

मुंबई : तीन वर्षांपूर्वी तत्कालिन आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील भा. रा. गावित या अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली होती. आता बच्चू कडू राज्यमंत्री झाले आहेत, अन् गावित हे कडूंच्याच बहुजन कल्याण खात्यात सहसचिव पदावर कार्यरत आहेत. आरोपी व तक्रारदार असलेल्या कडू – गावित यांना आता एकत्र काम करण्याची विचित्र कसरत करावी लागत आहे. त्यापेक्षाही गंमत म्हणजे आरोपी असलेले कडू हे बॉस आहेत, तर तक्रारदार गावित कडूंच्या हाताखाली काम करीत आहेत.

मारहाणीचे हे प्रकरण अजूनही न्यायप्रवीष्ठ आहे. बच्चू कडू यांच्या विरोधात त्यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. गावित यांनी त्यावेळी कडू यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात आरोपी असलेले कडू सध्या जामिनावर आहेत. शिवडी येथील न्यायालयात हे प्रकरण आहे. प्रकरणाच्या तारखा नियमितपणे पडत असतात. कडू मंत्रीपदावर आल्यानंतरही एक तारीख पडली होती.

कडू मंत्रीपदावर आल्यानंतर गावित यांनी काही महिन्यांपूर्वी ‘सामान्य प्रशासन विभागा’कडे लेखी अर्ज सादर केला आहे. अन्य खात्यात बदली करण्याची विनंती गावित यांनी या अर्जाद्वारे केली आहे. ही विनंती मान्य करून गावित यांची बदली उच्च व तंत्र शिक्षण विभागात करण्यात आली आहे. परंतु बहुजन कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गावित यांना कार्यमुक्त करण्यास विरोध केला आहे. या पदावर दुसरा अधिकारी येईपर्यंत गावित यांना कार्यमुक्त करण्यास वडेट्टीवार यांनी नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

गावित यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. बच्चू कडू हे तापट मंत्री आहेत. मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी दोन तहसिलदारांना निलंबित केले होते. तहसिलदारांना निलंबित करण्याचे अधिकार कडू यांना नाहीत, तरीही त्यांनी ते आदेश दिले होते. गावित हे तर बच्चू कडूंच्याच खात्यात आहेत. त्यामुळे कोणतेही कारण पुढे करून कडू आपणांस निलंबित करू शकतील अशी भिती गावित यांना वाटत आहे. गावित यांच्या निवृत्तीला जेमतेम दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कडू यांच्यामुळे भलतेच संकट अंगावर येईल असे गावित यांना वाटत आहे. त्यामुळेच गावित यांनी बदलीसाठी लेखी अर्ज सादर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या कारणास्तव बच्चू कडूंनी गावित यांना मारहाण केली होती

तीन वर्षांपूर्वी गावित हे सामान्य प्रशासन विभागात कार्यरत होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे वाटप त्यांच्या अधिकारात होते. त्यावेळी जाधव नावाच्या कर्मचाऱ्याला घर खाली करण्याच्या सूचना गावित यांनी दिल्या होत्या. आपल्या पत्नीला हृदयविकाराचा आजार आहे. त्यामुळे राहते घर रिकामे करून अन्यत्र स्थलांतरीत होण्यामुळे पत्नीची दगदग होईल. म्हणून घर खाली करण्याचा आदेश मागे घ्यावा अशी जाधव यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आमदार बच्चू कडूंची भेट घेतली. बच्चू कडू गावित यांना भेटायला आले, जाधव यांचे घर खाली करण्याची सूचना मागे घ्या अशी विनंती कडू यांनी गावितांनी केली. परंतु तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा असे गावित यांनी कडू यांना सांगितले. गावित यांनी त्यावेळी वापरलेले शब्द मग्रुरीचे होते अशी कडू यांची भावना झाली. त्यामुळे संतापलेल्या कडूंनी गावित यांच्या कानाखाली मारली. या प्रकारामुळे मंत्रालयात मोठीच खळबळ उडाली. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वातावरण तापले. कारण काहीही असले तरी कुणालाही मारहाण करणे अयोग्य आहे, अशी भावना अधिकारी वर्गातून त्यावेळी व्यक्त झाली होती. त्यानंतर गावित यांनी कडू यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कडू सध्या जामिनावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडू यांच्या कार्यालयातील अधिकारी सुद्धा ‘कडू’च

VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

13 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

13 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

14 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

14 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

16 hours ago