मुंबई

WHO : प्रमुखांनी केली भारताची प्रशंसा, म्हणाले – ‘Covid-19’ च्या समाप्तीसाठी उचलली निर्णायक पावले

मुंबई  :  जागतिक आरोग्य संघटनेचे ( WHO) महासंचालक टेड्रोस अ‍ॅधानॉम घेबरेयेसस यांनी कोरोना लसीसंदर्भात भारताची प्रशंसा केली आहे. साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करताना ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून भारताने कोविड -19 (Covid-19) साथीला संपुष्टात आणण्याचा आपला संकल्प पूर्ण केला आहे.

टेड्रोस यांनी ट्विट केले की, ‘भारत कोरोना साथीचा नाश करण्यासाठी सातत्याने निर्णायक पावले उचलत आहे. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून भारत आपले काम करीत आहे.’ साथीच्या विरोधातील लढाईत पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्यांनी लिहिले की, ‘जर आपण एकत्रितपणे काम केले तर प्रभावी लस वापरून प्रत्येक क्षेत्रातील अधिक असुरक्षित लोकांना वाचवण्याचे लक्ष्य निश्चित केले जाऊ शकते.’

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीमुळे जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त प्रमाणात लस तयार करण्याची क्षमता भारताकडे आहे. याव्यतिरिक्त भारताने अ‍ॅस्ट्रॅजेनेका, नोव्हाव्हॅक्स आणि गामाले रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी अधिकृतता प्राप्त केली आहे.

130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात लवकरच जगातील सर्वात मोठी देशांतर्गत लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पोलिओ आणि कॉलरासारख्या विविध रोगांच्या लसीकरण मोहिमेचा देशाला चांगला अनुभव आहे. भारतात प्रथम श्रेणीचे आरोग्य सेवा कर्मचारी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जाईल. सहा ते आठ महिन्यांत सुमारे 250 मिलियन लोकांचे लसीकरण केले जाईल असे सरकारचे उद्दिष्ट आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

13 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

13 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

14 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

15 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

17 hours ago