टीम लय भारी
गुवाहाटी : गेल्या सात दिवसांपासून महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचे आसाममधील गुवाहाटीत वास्तव्य आहे. याच दरम्यान आसाममधील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील ३२ जिल्ह्यांतील ४५ लाखांपेक्षा अधिक लोकांना या पुराचा फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता गुवाहाटीत बसलेल्या बंडखोर आमदारांकडून आसामला लाखो रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
याबाबतची अधिकृत माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.’ अशी माहिती देण्यात आली आहे. आसाममधील मुख्यमंत्री निधीमध्ये ही ५१ लाखांची मदत करण्यात आली आहे.
आसाम येथील करीमगंज, हैलाकांडी आणि कछार जिल्ह्यामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्हे हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची भयंकर अवस्था झाली आहे. दरम्यान, आज बंडखोर आमदारांचा गट हा गुवाहाटी येथूजन निघणार आहे. पण त्याआधीच त्यांच्याकडून हि मदत जाहीर करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा :
राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेने दिले सर्वोच्च न्यायालयात आव्हान
आमदार फुटला, पण त्याचे फेसबुक चालवणारा शिवसैनिक नाही फुटला
नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी लावली भांडणे
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…