Categories: क्रीडा

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीच्या आधी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, अचानक खेळाडू परतले

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया कानपूरमध्ये जोरदार मेहनत घेत आहे. दरम्यान, सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. पावसामुळे भारतीय संघाला सराव सत्र रद्द करावे लागले. (IND vs BAN Team India practice season canceled due to rain in kanpur)

IND vs BAN T20 मालिका या तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

कानपूरमधील खराब हवामानामुळे टीम इंडियाला गुरुवारी सराव करता आला नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून खेळाडूंचा सराव सुरू आहे. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडियावर भारतीय संघाचा सराव करतानाचा व्हिडिओही शेअर केला होता. टीम इंडिया या टेस्ट मॅचसाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. (IND vs BAN Team India practice season canceled due to rain in kanpur)

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यानही पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो. सामन्याचे पहिले तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान अहवालानुसार 27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.  (IND vs BAN Team India practice season canceled due to rain in kanpur)

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

मात्र, कसोटी सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत या सामन्याचा निकाल कोणत्याही एका संघाच्या बाजूने जाण्याची शक्यता फारच कमी आहे. हा सामना जिंकण्यासाठी संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे. मात्र, ड्रॉ होण्याची दाट शक्यता दिसत आहे. (IND vs BAN Team India practice season canceled due to rain in kanpur)

भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेसाठी कानपूर पोलीस पूर्णपणे तैनात आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त हरिश्चंद्र यांनी स्टेडियमच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या हातात घेतली आहे. हरिश्चंद्र म्हणाले की, कानपूर पोलिसांनी ग्रीन पार्क स्टेडियमभोवती सुरक्षा घेरा तयार केला आहे. ज्या हॉटेलमध्ये भारत आणि बांगलादेशचे संघ मुक्काम करत आहेत, त्याच हॉटेलला छावणी म्हणून तयार करण्यात आले आहे. नेट प्रॅक्टिससाठी जाणाऱ्या टीम बससोबत पोलिसांचा ताफा असतो. (IND vs BAN Team India practice season canceled due to rain in kanpur)

टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

काजल चोपडे

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

12 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

13 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

13 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

14 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

16 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

16 hours ago