आएपीएल संपून आता लवकरच टी-ट्वेन्टीसुरू होणार असून यी पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी ज्येष्ठक्रिडा पत्रकार विनायक दळवी यांची विशेष मुलाखत घेतली आहे.
आएपीएल संपून आता लवकरच टी-ट्वेन्टीसुरू होणार असून यी पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी ज्येष्ठक्रिडा पत्रकार विनायक दळवी यांची विशेष मुलाखत घेतली आहे (India Will Win T20 World Cup 2024). विनायक दळवी यांनी याआधी लोकसत्ता , दिव्य मराठी या दैनिकांमध्ये क्रिडा पत्रकार म्हणून काम पाहिलेलेअसून आजवर त्यांनी ९ वर्ल्ड कप स्पर्धांचं वार्तांकन केलेले आहे.क्रिडाक्षेत्रातील विशेषतः क्रिकेट मधील सर्व खाच खळगे त्यांना माहित आहेत. वर्ल्डकपला गृहीत धरून दळवी यांनी त्या विषयी सविस्तर माहिती येथे दिलेली आहे. मागचावर्ल्डकप आपण हरलो असलो तरी यंदा अधिक जोमाने आपण स्पर्घेत उतरू. आणि तसंही आएपीएलमुळेखेळाडूंची वर्ल्डकपसाठीची चांगली पूर्वतयारी झालेली आहे. आणि त्यामुळेच यावेळीहीफायनल ऑस्ट्रेलिया सोबत व्हावी आणि वर्ल्डकप पुन्हा भारतात यावा अशी सर्वक्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. क्रिकेट या खेळाला आधारआणि आसरा हा ख-या अर्थानेभारताने दिला आहे. या टी-ट्वेन्टी मध्ये ५५ सामने होणार असून पैकी १६ हे अमेरिकेतहोणार असून ४ हे भारताचे होणार आहेत. या वर्ल्डकप मध्ये भारत-पाक सामना हा शोकेसइव्हेन्ट असणार आहे, सर्वांचंच लक्ष या सामन्याकडे असणार आहे. १९ जूननंतर सेकंडहाफनंतर वर्ल्डकप खरा रंगात येईल. ५ तारखेला भारताची सलामीची मॅच होणार आहे.खेळाडूंविषयी बोलताना के.एल.राहूलला का घेतलं गेलं नाही, याचा प्रश्न सर्वचाहत्यांना पडलेला आहे. त्याची हार्दिक पांड्यापेक्षा तुलनेत चांगलीच कामगिरीहोती. आवेश खानची देखील गोलंदाजी होती. त्यालाही राखीव मध्ये ठेवण्यात आले. यावेळेसरोहित शर्मा हा स्फोटक ठरू शकतो, तर कोहली हा संथ खेळेन नेहमीप्रमाणे तर जयस्वालहा पॉझ घेउन. याहीवेळेस भारताला ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया हाधोकादायक संघ आहे. अंतिम फेरीपर्यंत हा संघ अजून ताकदीचा होत जातो असेस्पष्टीकरणासहित सविस्तर चर्चा ज्येष्ठ पत्रकार विनायक दळवी यांनी लय भारीचेसंपादक तुषार खरात यांच्याशी केली आहे.
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…
डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…
भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…