लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : अजित पवारांच्या पाठिंब्यावर भाजपानं सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. हे सरकार बहुमत सिद्ध करताना टिकणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
आज शनिवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा करणार होते. शनिवारी अचानक सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीला येत आहेत. जे आमदार शपथविधीला होते, त्यांना फसवण्यात आले. या सरकारचा शपथविधी झाला असला तरी हे सरकार बहुमत सिध्द करताना टिकणार नाही,” असं नवाब मलिक म्हणाले.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…