टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील तीन दिवसांपासून तर नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आढळत आहे. इतकेच नव्हे तर १५ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या तिपटीने वाढली आहे. कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार हे निर्लज्ज राजकारण करत आहे. देशातील सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगलेच फटकारले. पियूष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, असे खडे बोल बाळासाहेब थोरात यांनी सुनावले.
आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पियूष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पियूष गोयल महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असे सांगतात. आम्ही ऑक्सिजनची डिमांड कमी करावी, म्हणजे नक्की काय करावे, हे त्यांनी सांगावे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आम्हाला कळलेला नाही. पियूष गोयल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. आम्हाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. पण केंद्र सरकार आम्हाला अपेक्षित मदत करत नाही. त्यामुळे केंद्र सरकार अन्याय करत असल्याची भावना असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
फार्मा कंपनीसाठी फडणवीसांनी पोलीस ठाण्यात जाणे अयोग्य: बाळासाहेब थोरात
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात जाणे अयोग्य असल्याचे म्हटले. राज्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. आम्ही लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निर्यातबंदी झाल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स एखाद्या पक्षाला नव्हे तर राज्य सरकारला मिळायला हवी होती.
देवेंद्र फडणवीस यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी होती. मात्र, ते फार्मा कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात गेले. ही गोष्ट मला पटलेली नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
‘महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवता तर उपकार करता का?’
केंद्रीय मंत्री पियूष गोयल महाराष्ट्राची वकिली करायची सोडून जावडेकरांप्रमाणे महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवत आहेत. महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवूनही ठाकरे सरकार कोरोनाविरुद्ध लढण्यात अपयशी ठरले, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रश्न असा आहे की, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवून केंद्र सरकार मेहरबानी करत आहे का? मुंबईसह महाराष्ट्र तुमच्या म्हणजे केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा खणाखणा ओतत आहे. हा पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला ऑक्सिजनच्या नळकांड्या लावाव्या लागतील. महाराष्ट्राने देशातील लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था सदैव केली आहे. पण आज महाराष्ट्र संकटात असताना केंद्रातील मंत्री हिशेबाच्या चोपड्या फडकवून महाराष्ट्राला त्रास देत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…