लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबर सोमवारपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे. यामुळे आज रविवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप सत्तास्थाण्याचा निर्णय घेणार आहे. अशी माहिती भाजपा नेते सुधीर मुगंटीवार यांनी दिली.
राज्यपालांकडून भाजपाला यासंदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांकडून आलेल्या पत्रावर आज भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय होणार आहे. राज्यपालांनी निमंत्रण देणं हा घटनात्मक प्रक्रियेचा भाग आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
१३ विधानसभेची मुदत शनिवारी मध्यरात्री संपुष्टात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर केला. तर राज्यपालांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना फडणवीस यांना केली होती.
शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपला सत्तास्थापन करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप सत्तास्थापन करण्याचा दावा करणार की नाही आज भाजप त्याबाबत बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या.
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…