अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारयांनी शिंदे-फडणवीस सरकार सोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि सरकारमध्ये येऊन बसले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यामुळे राज्यातील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. हे पद आत्ता काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये काँग्रेसचे संख्याबळ हे शिवसेना ( उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसने आज प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत विरोधी पक्षनेते पदाच्या बाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
काल (बुधवार ) मुंबईमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या बैठका पार पडल्या. कोणाकडे कीती आमदार आहेत हे ह्या बैठकी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न होता पण आता राष्ट्रवादी मध्ये फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभेती संख्याबळ कमी झाले आहे. आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे विरोधी पक्षनेते पद सुद्धा रिक्त आहे. यावरच चर्चा करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली खाली आज काँग्रेसची बैठक आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर आणि आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा या बैठकीत होणार असल्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा:
महिला प्रवासी सुरक्षितेसाठी राज्य आणि रेल्वे पोलिसांनी समन्वयाने काम करावे- उपसभापती डॉ. गोऱ्हे
त्यांचं नाणं चालणार नाही; शरद पवार यांचा अजित पवारांना टोला
वय 82 झालं, कधी थांबणार आहात की नाही? अजित पवार यांचा शरद पवारांना सवाल
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी चे अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते. महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी विधानसभेत संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीतून निवडण्यात आला होता. पण आत्ता अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून सरकारमध्ये जाऊन बसल्याने विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. तात्पुरता हे पद राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाडांना देण्यात आले आहे. परंतु, अजित पवार सरकारमध्ये सामील होताना त्यांच्या सोबत अनेक आमदार घेऊन गेल्याने विधानसभेत शरद पवार गटाची ताकद कमी झाली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी एक वर्षपूर्वी शिवसेनेत बंड केल्यामुळे ठाकरे गटाची ताकद विधानसभेत कमी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीला महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त आमदार हे काँग्रेस पक्षाकडे आहेत. ज्याचे आमदार जास्त त्याला विरोधी पक्षनेते पद या फॉर्म्युल्या नुसार हे पद काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अनेकनेत्यांनी दावा केला असून महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार यावर निर्णय घेतला जाणार, अशी भूमिका घेण्यात आली आहे. तसेच काँग्रेसच्या या बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…